By.. Adv. Yashwant P Deore (Mali) ....... Service To Man Is Service To God .....
We Have The Most Beautiful World Within Peace Of Mind....Just Try To Understand.... And Feel And Utilize.........It Always Follows You.......!
Saturday, March 14, 2026
नशा - अकाली जीवन अंत्ययात्रा
व्यसनाधिनता ही जबरदस्त जीवन घातकी किड-दिमक आहे, ज्यामुळे आयुर्मान कमी करणे व दारिद्र्यला आमंत्रित करून कुटुंबातील उर्वरीत सदस्य आणि जोडीदार यांना कधीही न संपणाऱ्या अंधाराच्या गुहेत ढकलण्याइतके गंभिर सत्य आहे.
अडाण्यापासुन उच्चशिक्षित वर्गातील तरुणांचा समावेश यात आपणास पाहायला मिळतो. अलीकडे युवकांमध्ये सर्वच प्रकारचे व्यसन वाढलेले आहे. त्यामुळे आपली प्रतिमा डागाळली जाते. समाजामध्ये असलेले स्थान, दर्जा टिकवायचा की त्याला सुरुंग लावायचा हे आपल्याच हातात असते. आपल्यामुळे कित्येकांची मने दुखावली जातात. आपण आपल्या मनमानीने वागतो. पण त्याचा इतरांना काय त्रास होतो, याचे आपण कधी आत्मपरीक्षण करत नाही.
राहण्याच्या ठिकाणाचा विपरित मौहोल, वाट चुकलेले मित्रपरिवार आणि नकारात्मक परिस्थिती या गोष्टी व्यसनाधिनतेला पूरक ठरतात.
व्यसनापासून चार हात लांब राहणे हा सुंदर जीवनाचा आस्वादी मूलमंत्र आहे.
एकदा का व्यक्ती व्यसनाच्या जाळ्यात गेला , त्याची वापसी नगण्य.
मौज आणि हौस म्हणून कधी कधी विविध आनंदमय कार्यक्रमांमध्ये केली जाणाऱ्या या जीवघेण्या चेष्टेवर पालकांनी वेळीच आवर घालणं अती आवश्यक असते. व्यसनाधिनता ही तात्कालिक आनंद देणारी प्रकृतीच्या विरूद्ध मार्गास नेणारी एक राक्षसी वृत्ती आहे.
वर्तमान तरुणांनी आनंदासाठी अव्यवहार्य मार्ग कदापि निवडू नयेत वा त्यांना बळी पडू नये. आपोआप किंवा कालांतराने व्यसन निर्वाणाची शक्यता नसतेच.
केवळ नारदमुनी भेटले म्हणून वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाला. असे प्रत्येका बरोबर नाही होऊ शकत. व्यसनाच्या आहारी गेलेली लोकं रात्रंदिवस स्वतःच्या आनंदासाठी जगतात. आपल्या जवळच्या व्यक्तींचा विचार करत नाहीत. आपल्या संसारावर, मुलाबाळांबर, आई-वडिलांवर जर त्याचे विपरीत परिणाम घडत असतील, तर असा उपदव्याप काय कामाचा ? त्यातून त्यांचं मानसिक संतुलन बिघडून आयुष्याचा एकूणच जीवन आलेख बिघडतो. यापेक्षा निपुत्रिक असणे बरे.
वेळ मारून न नेता या गंभीर परिस्थितीत पालकांचे किंवा व्यसनमुक्तीवर कार्य करणाऱ्या तज्ञ मार्गदर्शकांमार्फत समुपदेशन करून घ्यावे व या जीवघेण्या जाळ्याच्या विळख्यातून बाहेर पडावे. उपयोगी व आवडते छंद जोपासावेत. सकारात्मक कार्यमग्नता असावी. व्यसन परावृत्तीसाठी परिणाम कारक मार्गांचा अवलंब करावा.
परंतु या ऐवजी धाडसी पण निरुपयोगी असे निर्णय अलीकडे आपल्या आजुबाजूला पाहायला मिळतात.
व्यसनी व्यक्तीस कुटुंबातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या अथवा लग्न करून देणे हा त्याच्यावरचा रामबाण उपाय होऊच शकत नाही. पण समाजातील बुजुर्ग व्यक्ती कधी कधी असे अव्यावहारिक उपदेश देतांना दिसतात. आणि यामुळे आईवडिलांच्या आज्ञाधारक तरुणींच्या आयुष्याचे वाटोळ्याची निश्चिती केली जाते. ही तर विषपरीक्षा आहे, त्यातून शेवटी निराशा आणि शोकांतिकाच मिळणार.
यांवर परिणाकारक उपाय म्हणजे विवाह जुळविताना चौकस असणे. मुलींनी उत्तम दर्जाचे व्यावसायिक शिक्षणाचा मार्ग निवडणे. दुर्दैवाने नशिबी मद्यपी आलाच तर शैक्षणिक, व्यावसायिक गुणवत्ता असल्यामुळं पुढील जीवनाची वाताहत लागणार नाही. आत्मनिर्भर असल्यामुळे होऊ घातलेली विपरीत परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचे धाडस कोण करणार नाही.
माझ्या गुरूचा उपदेश: आयुष्यभर आईवडिलांच्या आयत्या संपत्तीवर जगलात तरी चालेल पण कोणत्याच व्यसनाच्या आहारी जाऊ नका. वयोवृद्ध मातापित्यांना आपल्या काळजाच्या तुकड्याचा आयुष्याचा व्ह्रास आणि अंत पचविणे हे नरकयातना पेक्षा कमी नाही.
: स्नेहयश.
Sunday, March 1, 2026
संकटकाळीतल एकमेव ढाल: माता पिता
आई आणि वडील यांच्यासारखे दुसरे दैवत अथवा पर्याय असूच शकत नाही.
अशोक , वय वर्ष 32 उंच पुरे शरीर, मजबूत शरीर बांधा, स्वतःवर भक्कम आत्मविश्वास, बायको,मुले सर्व काही सुरळीत. भल्या मोठ्या मेट्रोपॉलिटन शहरामध्ये कायम मोठ्या पगाराची सरकारी नोकरी , सर्व नियमित आणि चौकटीत सुरू असताना अचानक त्याच्या डोक्यात उजव्या बाजूला किंचितसे ... टिक टिक असे जाणवु लागले होते. कदाचित ते रक्तचापाशी संबंधित असू शकेल. मार्च व एप्रिल महिन्यात कामाचा व्याप जास्तीच असतो. कमी वेळात बरेच काही कार्यालयाचे काम पूर्ण करून द्यावे लागते. त्या अतिरिक्त ताणतणावाची कदाचित ती परिणिती ती असू शकेल. पण त्याच्या उच्चशिक्षित दिमाखात नको ते वाईट विचार येत होते. पुढच्या क्षणी त्याच्याबरोबर काय विपरीत होऊ शकेल या संदर्भात क्षणोक्षणी त्याच्या मनात विचारांचे काहूर माजले होते. पेन किलर्स औषधी, गोळ्या घेऊन बघितल्या, पण त्यांचा फारसा काही उपयोग झाला नाही. दोन लहान मुले. पत्नी मुलांच्या निस्सिम प्रेमापोटी, पत्नी घाबरून जाऊ नये म्हणून तिला या संदर्भात थोडेसे काही डोके दुखते असे भासविले. त्यादरम्यान काय त्याचे भाग्य, चारशे किलोमीटर अंतरावरून योगायोगाने आई-वडील गावावरून मुलीला भेटण्यासाठी बालसाड ला आलेत. चार दिवसांनी तिच्याकडून मुंबईला मुलाला भेटण्यासाठी अशोककडे देखील आलेत. हेच ते आईवडील ज्यांनी अशोकला आजपर्यंत गरिबी व दुःखाचा स्पर्शदेखील होऊ दिला नव्हता. अशोक त्यांचा एकुलता एक मुलगा. अशोक आता जास्तच विचार करू लागला. त्यांना आपल्या मुलाला अशा केविलवाण्या अवस्थेत बघावे लागेल की काय हाच त्याचा मनात सातत्याने विचारचक्र सुरू होते. अशोक वरवर सामान्य असण्याचा आव आणत होता खरे, पण दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्याशी गप्पा करत असताना त्याला मात्र राहवले गेले नाही. त्याला होणारा त्रास त्यांना क्षणार्धात सांगून टाकला. दुसऱ्या दिवशी सकाळी मोठ्या इस्पितळात तपासून घेण्याबाबत चे नियोजन करण्याचा त्याच्या वडिलांनी गंभीर सल्ला दिला व त्याला ते स्वतःच इस्पितळात तपासण्यासाठी घेऊन जातील असे ठरले.
त्यांनी अगदी छोट्या बाळासारखे त्यास दुसऱ्या दिवशी सकाळी मोठ्या दवाखान्यात नेले व सर्व चाचण्या करवून घेतल्या. चाचण्याअंती गंभीर काळजी करण्यासारखे काही खास निदर्शनास आले नाही.
दोन पाच औषधी दिल्या गेल्या. पण त्यादरम्यान आई-वडिलांच्या सहवासाची ऊब अशोक साठी खूपच जगावेगळी होती. लहानपणापासून तर आतापर्यंत त्यांनी त्याची अनेकविध प्रकारे कशी काळजी घेतली त्या संदर्भात त्याच्या मनामध्ये विचारांचे चक्र फिरत होते. सामान्य शेतकरी कुटुंब, आईवडिलना चार अपत्य, त्यात अशोक सर्वात मोठा, आईवडिलांनी दिवसभर शेतात राबराब राबून कुटुंबाची सातत्यानी घेतलेली काळजी, ते सर्व त्याच्या नजरेसमोर येत होते. निसर्ग संकट,शेतमालाला व्यापार वर्गांकडून मिळणारा अन्यायी भाव या सर्व गोष्टी तर विपरीत होत्या. तरी देखील आपल्या मुलाबाळांवर त्या संदर्भात कोणत्याही प्रकारची नकारात्मक छाया पडू देता मुलांना व्यवस्थित मार्गस्थ केले होते. त्यांच्या पारंपारिक विचारसरणीनुसार जीवनाची व्याख्या म्हणजे कष्ट करणे व मुला बाळांचे संगोपन करणे हीच होय, त्या पलीकडे अजून वेगळे विश्व असते असे त्यांना दूरपर्यंत माहीतच नव्हते. त्यांनी सोसलेल्या कष्टाचा एक एक क्षण दररोज अशोक च्या मनामध्ये यायचा. मुलांवरचे मातृ पितृ मूल्य मात्र कधीही कमी झालेले त्याला आठवत नव्हते. निसर्गाची ती एक आगळीवेगळी अशी किमया आहे. आणि आता तर त्याच्या या जीवघेण्या दुखण्याने त्याला दूरवर आई-वडिलांशिवाय कोणीही दिसत नव्हते. त्याच्यासाठी फक्त त्याच सदृश्य प्रतिमा होत्या. थोडक्यात तो कोण आहे याचा त्याला विसरायला झाले होते आणि फक्त घरातील त्या चार चौकटीत आई वडील आणि स्वतः त्याला दिसत होता .पत्नी व मुलांविषयी विचार करणे देखील त्याच्या पचनी पडत नव्हते. थोडक्यात म्हणजे त्याने स्वीकारून घेतले होते की त्याचे थोडेच दिवस शिल्लक असावेत. पण काय ती ईश्वर किमया, आईवडिलांच्या पवित्र सानिध्यामुळे त्याचे ते दुखणे हळूहळू बरे व नंतर नाहीसे झाले. अशोकला बरे वाटायला लागले. आणि तो पूर्ववत बारा झाला. हीच ती मातापित्याची ईश्वरी कृपा. जोपर्यंत आईवडील आहेत तोपर्यंत आपल्याभोवती एक निसर्गशक्ती चे संरक्षक कवच असते, त्यांची काळजी घेणे म्हणजे स्वतःला सुरक्षित करणे हा अशोक चा वास्तविक अनुभव.
सरासरी वरील प्रसंग हेच सांगतो की
आई-वडील हे ईश्वराचे रूप असून त्यांच्या कष्टांची आणि प्रेमाची जाणीव ठेवणे हे प्रत्येक मुलाचे कर्तव्य आहे. त्यांच्या छत्रछायेखाली आयुष्य सुरक्षित राहते. "पैशाने सर्व काही मिळेलपण आईसारखा स्वर्ग आणि बापासारखी सावली कुठेच मिळणार नाही" असे मानले जाते. 'मातृदेवो भवपितृदेवो भव' ही आपल्या संस्कृतीची शिकवण आहे.
वडील म्हणजे एक अशी व्यक्तीजी स्वतःच्या स्वप्नांचा त्याग करून मुलांची स्वप्ने पूर्ण करणारी,कुटुंबाचा कणाकष्टाची सावली आणि निःस्वार्थ प्रेमाचे निस्सीम प्रतीक असणारे, मुलांच्या यशाचा आनंद साजरा करणारे आणि अपयशात पाठीशी उभे राहणारे ढाल असतात.
आईबाबा हे जगातील इतके मोठे व्यक्ती आहेत, की ज्यांच्या कष्टाच्या घामाच्या थेंबाची परतफेड कोणत्याच मुलांना कोणत्याच जन्मी करणे शक्य नहीं. आणि त्याची परतफेड केली पाहिजे अशी अपेक्षा ते पण करत नाहीत. त्याचा गौरव म्हणजे तुमचे माझे समाजमान्य वर्तन ज्यामुळे त्यांचा आनंद गगनात मावत नाही.
आपल्या आयुष्यात दोनच लोक असे असतात ज्यांच्यावर, ज्यांच्या निर्णयावर आपण डोळे बंद करून विश्वास ठेवू शकतो. नंतर बोलू किंवा बघू या भ्रमात राहू नका. आजच त्यांच्याशी वेळ काढून गप्पा करा, त्यांची विचारपूस करा. त्यांनी केलेल्या संघर्षमय मेहनत प्रसंगावर चर्चा करा. खूप बरे वाटते त्यांना त्याचा यशस्वी भूतकाळ ऐकायला. काळावर नियंत्रण ठेवण्याएवढे तुम्ही, मी शक्तिवान नाहीत. आपल्या भारतीय संस्कृतीत आई वडिलांना देवाचा दर्जा देण्यात आलेला आहे. त्यांचा आदर करून त्यांच्या आज्ञाचे पालन करणे इतकेच नव्हे तर त्यांच्या उतारवयात संपूर्ण काळजी घेणे हे आपले आद्य कर्तव्य आहे.
अनुतात्या ना समर्पित.
लेखक: स्नेहयश.
Sunday, November 23, 2014
SAINT DNYANESHWAR MAHIMA GATHA
Sunday, September 23, 2012
Lord Ganesha.....A Saviour To Mankind.......
Friday, August 17, 2012
POLA...A FESTIVAL......DEBT TOWARDS BULLS......
Pola Festival is celebrated throughout the state of Maharashtra, in the Hindu month of Shravan (that usually coincides August). It falls on day of Pithori Amavasya (new moon day) in Shravan. The festival marks the day when farmers worship their bulls and they are not given any routine work during the two days.. On the day before Pola Festival, fa
rmers remove 'vesan' (the rope) from the nostrils of their bull. Thereafter, they apply a paste of turmeric powder and ground nut oil, on its shoulders.
Finally, the bull is given a hot water bath and served with khichadi, made of bajari. On the day of the festival, the bull is taken to the nearest river or pond and given a thorough bath. The farmers then paint the bull's horns and put colorful ornaments over them. Lastly, an ornamented shawl is put over the body of the bullocks and their neck is adorned with flower garlands. After decorating the bulls, the farmers worship them. Evening time is reserved for taking enthusiastic processions of all the bulls in the area, beautifully adorned, through the streets.
Side by side, instruments like drums, bugles, lezims are played loudly (a typical Indian musical instrument), etc. At some of the villages in India, even fairs are organized as a part of the celebrations. The major attractions of these fairs comprise of competitions and outdoor games like volleyball, wrestling, kabaddi,etc. In towns and cities, instead of worshipping bulls, people worship their statues, either wooden or earthen. Last but not the least, Puran Poli (a sweet dish) adds the perfect flavor to the festivities.
The Man Of Confidence And Iron Will...Lokmanya Tilak
Sunday, July 1, 2012
POLITICIANS ARE IN NUMBERS...BUT WHERE IS STATMENSHIP........?
The nee of the hour is not the just talk of peace, progress and prosperity But honest efforts and step in that direction and one importantly in the field of politics of India. As we Indian have opted for democracy so we need leadership. And politicians play the role to exercise it from villages to capital city of India. Initially leaders were come front to reach the basic requirements of the needed people of our country. So at the certain extent our nation attained development and still it is going on. But we don't find as it should be as our fundamental needs to be met. We speak about to step on the moon and it is must if we want to be in the technological flow and the race of the rest countries. But when we peep onto the ground level with encountering problems, we feel great fear of all that. Politicians are lot. They come front for the welfare of people with the various criticisms of the rests. They elect after much expenditure as we see when the elections are held. How do we expect from them the real welfare and progress of the certain area? The politicians and other responsible for the today’s cause. We know the hardships and attainment of Gandhi, Sardar Patel and Lalbahadur Shastri and many more. They were gone through continuous hard work and upliftment of subjects and that is pure patriotism. The real social service never asks for the investment of personal property or money. And if it is seen then something is going wrong. Patriotism is far away from the hearts of the most of the present day politicians as can be judged from their cumulative actions of thoughts and deed which have brought the country in the danger and its democracy. They are very close to change the meaning of democracy as we see how they behave. Population, Poverty, corruption and terrorism are the basic causes to hold back us from the progress of masses. We are independence but made busy in unfolding tasks.
Having put the country in its correct perspectives in the hearts of masses and on the globe we must eradicate the problems of Population, Poverty, corruption and terrorism. And so for we must keep off the selfish and discriminative thinking aside and understand the right of every life here on.
If the present trends continue, posterity will only blame the present generation for forcing the country in the burning problems ever. And why don’t we see by our open eyes that the developed India cannot be built by the recurring problems such as Population, Poverty, corruption and terrorism, if some of third rated leaders (selfish) hold the decisive posts in the country.
Subscribe to:
Comments (Atom)